पोलीस ऑपरेशन भ्रष्टाचार राबवतायत…गोहत्यावरून मिलिंद एकबोटेंची प्रशासनावर सडकून टीका

Milind Ekbote criticizes Govornment over cow slaughter: गोवंश हत्या बंद केली जावी तसेच पोलीस प्रशासनाकडून ठोस कारवाई केली जात नसल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालय येथे गोरक्षकांचे उपोषण सुरु आहे. यावेळी हिंदुत्ववादी नेते मिलिंद एकबोटे यांनी या उपोषण स्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी राजकीय पुढाऱ्यांसह प्रशासनावर जोरदार टीका केली. गोहत्या हि थांबली पाहिजे हि मागणी काही चुकीची नाही. मात्र या मागणीसाठी उपोषण करावे लागते हे दुर्दैव आहे. अशा शब्दात एकबोटे यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली.
शाळांमध्ये मराठी भाषा शिकवा नाहीतर गाठ शिक्षणमंत्र्यांशी; शाळाच रद्द करण्याचा भुसेंचा इशारा
गोवंश जनावरांची हत्या हि थांबली पाहिजे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे मढीचे सरपंच संजय मरकड यांनी उपोषण सुरु केले आहे. या उपोषणकडे प्रशासनाने चक्क कानाडोळा केला. या उपोषणाला हिंदुत्ववादी नेते मिलिंद एकबोटे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय येथे जात प्रशासकीय अधिकाऱ्याची देखील भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पोलीस प्रशासनाचे अक्षरशः वाभाडे काढले.
पोलीस ऑपरेशन भ्रष्टाचार राबवतायत
पाथर्डी तालुक्यामध्ये गोहत्या होत आहे मात्र पोलीस प्रशासनाकडून ठोस करवाई केली जात नाही. एकीकडे सीमेवर आपले सैनिक ऑपरेशन सिंदूर राबवून देशसेवा करतायत. सैनिक देशाचे रक्षण करतात तर दुसरीकडे आपले पोलीस प्रशासन हे ऑपरेशन भ्रष्टाचार राबवत आहे. केवळ भ्रष्टाचारासाठी व केवळ आपल्या फायद्यासाठी हे प्रशासन अत्यंत बेजबाबदारपणे वागत असल्याची थेट टीका यावेळी एकबोटे यांनी केली.
तर पालकमंत्र्यांनी पंढरपूरला जाऊ नये
या उपोषणस्थळी पालकमंत्र्यांनी भेट दिली नाही किंवा याबाबत जाणून घेतले नसल्याने मंत्री राधाकृष्ण विखेंवर देखील एकबोटे यांनी सडकून टीका केली. पालकमंत्र्यांचा मी जाहीर निषेध करतो. गोमातेच्या रक्षणासाठी उपोषण सुरु ठेवावे लागत असेल तर हि लज्जास्पद गोष्ट आहे. पालकमंत्र्यांना मशिदीवरील भोंगे उतरवे नाही असे वाटत असेल तर त्यांनी यंदाच्या आषाढी एकादशीच्या पालखी सोहळ्यामध्ये भाग घेऊ नये. तसेच त्यांनी पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला जाऊ नये. अशा शब्दात एकबोटे यांनी मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर जोरदार टीका केली.
आमदार – खासदारांची देखील ही नैतिक जबाबदारी
गोहत्या थांबली पाहिजे यासाठी दोन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषण सुरु आहे. या जिल्ह्यातील नेते आमदार खासदार यांची देखील नैतिक जबाबदारी होती कि या उपोषणाबाबत त्यांनी आवाज उठवला पाहिजे होता. एखाद्यानं या मागण्या मान्य नसतील तर लोकशाही म्हणून खासदार निलेश लंके यांनी या मागण्यांबाबत निर्णय का झाला नाही? याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारला पाहिजे.